नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhash Chandra Bose
नेताजी सुभाषचंद्र बोस
(दि.२३ जानेवारी, १८९७ - १८ ऑगस्ट, १९४५)
(अल्प परिचय)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते
आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. नेताजी ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी.
सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या
व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई
प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या
घडणीत महत्त्वाचे आहेत.दि. २६ जानेवारी, १९४१ रोजी ते जर्मनीत
गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी हिंदी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढ्यास प्रवृत्त
केले आणि बर्लिन आकाशवाणीवरून ते देशबांधवांना सातत्याने आवाहन करीत राहिले.
जर्मनी - इटलीमधील भारतीय सैनिकांना भेटून त्यांनी आपले मनोगत सांगितले व
ब्रिटिशांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले. जपान येथे आल्यानंतर त्यांनी
स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर दुसरी आघाडी उघडली. दि.२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर
येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्ट्रप्रमुख,
पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले.
या शासनाला जपान, जर्मनी, इटली,
ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने
इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने
अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला.
ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या. इंफाळ येथे लढाईला
तोंड फुटले, परंतु तेथे आझाद हिंद सेनेला नैसर्गिक
आपत्तींमुळे माघार घ्यावी लागली.महायुद्धात जर्मनी-इटली व नंतर जपानचा पराभव झाला
जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली. त्या वेळी त्यांनी रशियाला जाण्याचा
निर्णय घेतला. मांचुरियाहून त्यांना धाडण्याची व्यवस्था फिल्ड मार्शल ताराऊ याने
केली. सायगावहून दि. १७ ऑगस्ट, १९४५ रोजी त्यांनी प्रयाण
केले. मार्गावर दि. १८ ऑगस्ट, १९४५ रोजी तैपे (तैवान) येथील
विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले. आझाद हिंद सरकारच्या
स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीतबनले.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS